महाराष्ट्रात रेशन कार्डधारकांसाठी मोठा धक्का आला आहे. ई-केवायसी (e-KYC) मोहिमेदरम्यान राज्य सरकारने १८ लाखाहून अधिक रेशन कार्ड रद्द केले आहेत. याचा कारण म्हणजे काही लोकांनी सरकारी धान्याचा गैरवापर केला.
ई-केवायसी म्हणजे काय?
ई-केवायसी अंतर्गत, लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळख, आधार नंबर, उत्पन्न इत्यादी तपासली जाते. या तपासणीत अनेक गैरप्रकार समोर आले आहेत:
- मृत व्यक्तींच्या नावावर रेशन घेतले जात होते.
- जास्त पगार असलेले सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि खासगी अधिकारी रेशनचा गैरफायदा घेत होते.
- व्यापारी आणि व्यावसायिक सुद्धा चुकीचा फायदा घेत होते.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड जास्त रद्द झाले?
- मुंबई: 4.80 लाख रेशन कार्ड रद्द
- ठाणे: 1.35 लाख रद्द
- एकूण 6.85 कोटी शिधापत्रिका असून 5.20 कोटींचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे.
- 1.65 कोटी रेशन कार्डची प्रक्रिया अजून बाकी आहे.
सरकारने काय केले?
- ज्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे, त्यांनी ही योजना वापरू नये असं सरकारने सांगितलं आहे.
- बनावट कागदपत्रांवर रेशन कार्ड बनवून बांगलादेशी नागरिकांना देखील लाभ मिळत असल्याचं आढळलं आहे.
- त्यामुळे सरकारने गैरफायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे.
ई-केवायसीसाठी मुदतवाढ
ज्यांनी अद्याप आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर जवळच्या केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी. नाहीतर त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते.
ई-केवायसी ही सुरक्षित प्रक्रिया आहे, पण सावधगिरीने व खरेखुरे कागदपत्रांसहच यामध्ये सहभागी व्हा.