राज्यात 18 लाख शिधापत्रिका रद्द; तुमचा रेशन कार्ड सुरक्षित आहे का? त्वरित तपासा

महाराष्ट्रात रेशन कार्डधारकांसाठी मोठा धक्का आला आहे. ई-केवायसी (e-KYC) मोहिमेदरम्यान राज्य सरकारने १८ लाखाहून अधिक रेशन कार्ड रद्द केले आहेत. याचा कारण म्हणजे काही लोकांनी सरकारी धान्याचा गैरवापर केला.


ई-केवायसी म्हणजे काय?

ई-केवायसी अंतर्गत, लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळख, आधार नंबर, उत्पन्न इत्यादी तपासली जाते. या तपासणीत अनेक गैरप्रकार समोर आले आहेत:

  • मृत व्यक्तींच्या नावावर रेशन घेतले जात होते.
  • जास्त पगार असलेले सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि खासगी अधिकारी रेशनचा गैरफायदा घेत होते.
  • व्यापारी आणि व्यावसायिक सुद्धा चुकीचा फायदा घेत होते.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड जास्त रद्द झाले?

  • मुंबई: 4.80 लाख रेशन कार्ड रद्द
  • ठाणे: 1.35 लाख रद्द
  • एकूण 6.85 कोटी शिधापत्रिका असून 5.20 कोटींचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे.
  • 1.65 कोटी रेशन कार्डची प्रक्रिया अजून बाकी आहे.

सरकारने काय केले?

  • ज्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे, त्यांनी ही योजना वापरू नये असं सरकारने सांगितलं आहे.
  • बनावट कागदपत्रांवर रेशन कार्ड बनवून बांगलादेशी नागरिकांना देखील लाभ मिळत असल्याचं आढळलं आहे.
  • त्यामुळे सरकारने गैरफायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे.

ई-केवायसीसाठी मुदतवाढ

ज्यांनी अद्याप आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर जवळच्या केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी. नाहीतर त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते.


ई-केवायसी ही सुरक्षित प्रक्रिया आहे, पण सावधगिरीने व खरेखुरे कागदपत्रांसहच यामध्ये सहभागी व्हा.

Leave a Comment