आजकाल आर्थिक परिस्थिती खूप बदलत आहे. त्यामुळे आपलं भविष्य सुरक्षित करायला चांगली योजना आखणं फार गरजेचं आहे. आपल्याला नंतरच्या गरजांसाठी पैसे जमवायचे असतात. लोक पैसे कुठे गुंतवावेत, याचा विचार करतात. काही लोक शेअर बाजारात पैसे गुंतवतात, काही म्युच्युअल फंडात किंवा सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. बँकेतही ठेवी करतात. सोने, विमा, पीपीएफ असेही पर्याय लोक पसंत करतात. पण सुरक्षितपणा आणि नक्की परतावा पाहिजे तर पोस्ट ऑफिसची आवर्ती ठेव योजना चांगली आहे.
आवर्ती ठेव म्हणजे काय?
ही योजना अशी आहे की तुम्ही दर महिन्याला काही ठराविक रक्कम पोस्ट ऑफिसमध्ये जमा करता. उदाहरणार्थ, जर तुम्ही दर महिन्याला १०,००० रुपये जमा केले, तर पाच वर्षांनंतर चांगली रक्कम जमा होते. या योजनेमध्ये सरकारची हमी असते, त्यामुळे पैशांची सुरक्षा खात्रीशीर असते.
योजनेचे फायदे
- नियमित बचत: दर महिन्याला काहीतरी रक्कम जमा केल्याने आपल्याला शिस्तीत बचत करायला शिकायला मिळते.
- चांगले व्याज: सध्या या योजनेवर सुमारे ६.७% व्याज मिळते, जे बँकेतल्या ठेवींपेक्षा जास्त आहे.
- कमी रक्कमपासून सुरूवात: फक्त १०० रुपयेपासून ही योजना सुरू करता येते, त्यामुळे कोणत्याही उत्पन्नाच्या लोकांनाही पैसे गुंतवता येतात.
- सरकारी पाठबळ: ही योजना केंद्र सरकार चालवते, त्यामुळे बाजारातील चढ-उतार याचा या योजनेवर काहीही परिणाम होत नाही.
- कर सवलत: या योजनेत गुंतवणूक केल्यावर आयकरात सूटही मिळते.
चक्रवाढ व्याज म्हणजे काय?
या योजनेत तुम्हाला दरवर्षी व्याजावर देखील व्याज मिळते. म्हणजे फक्त तुमच्या जमा केलेल्या पैशांवरच नाही, तर त्या व्याजावरही तुम्हाला नफा मिळतो. त्यामुळे जास्त काळ गुंतवणूक केली, तितका जास्त फायदा होतो.
कोणासाठी योग्य आहे ही योजना?
- ज्यांना नियमित पगार येतो, ते मासिक बचत करु शकतात.
- मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, घर खरेदीसाठी किंवा निवृत्तीनंतर खर्चासाठी पैसे जमवायचे असतील तर ही योजना चांगली आहे.
- ज्यांना पैसा सुरक्षित हवा आहे आणि धोका घ्यायचा नाही, त्यांच्यासाठी ही योजना आदर्श आहे.
खाते कसे उघडावे?
पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन थोडेसे कागदपत्र द्यावे लागतात, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्ता दाखवण्यासाठी वीज बिल, आणि एक छायाचित्र. नंतर तुम्ही खाते सुरू करू शकता.
सामान्यपणे ही योजना ५ वर्षांसाठी सुरू होते. पण तुम्हाला हवे असल्यास हा काळ पुढे वाढवता येतो. दर महिन्याला ठराविक दिवशी पैसे जमा करावे लागतात. हप्ता वेळेत जमा न केल्यास जरा शुल्कही लागू शकते.
ही योजना लोकांना सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने पैसे बचत करायला मदत करते. त्यामुळे भविष्यात आर्थिक अडचणी कमी होतात.