12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात PM Kisan योजनेचे चे 4000 रुपये जमा होणार

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळालेला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा नवीन हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळून एकूण ४००० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होऊ लागले आहेत.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या योजनांचे वितरण सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. पीएम किसान योजनेतून २००० रुपये आणि नमो शेतकरी योजनेतून २००० रुपये, असे मिळून एकूण ४००० रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना याबाबत बँकेचे SMS मेसेज यायला सुरुवात झाली आहे.

राज्य सरकारने हे पैसे तीन टप्प्यांमध्ये वाटण्याचा निर्णय घेतला आहे:

  1. पहिल्या टप्प्यात – १२ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले.
  2. दुसऱ्या टप्प्यात – पुढील १२ जिल्ह्यांना पैसे मिळतील.
  3. तिसऱ्या टप्प्यात – उरलेल्या १२ जिल्ह्यांमध्ये पैसे पोहोचतील.

एकूण ३६ जिल्ह्यांतील शेतकरी या लाभासाठी पात्र आहेत.

या योजनेचा लाभ फक्त ९ मान्यताप्राप्त बँकांतील खातेदार शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. त्या बँका म्हणजे:

  • महाराष्ट्र बँक
  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
  • बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ बडोदा
  • इंडियन बँक
  • पोस्ट बँक (डाकघर)
  • HDFC बँक
  • ICICI बँक
  • जिल्हा मध्यवर्ती बँक

आधार कार्ड लिंक असणे आवश्यक

शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. अजून कोणी हे काम केलं नसेल तर त्यांनी लगेच आधार लिंक करून घ्यावा, नाहीतर पैसे अडू शकतात.

राज्य सरकारनुसार पैसे सकाळपासून रात्री १२ वाजेपर्यंत कधीही खात्यात जमा होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा आणि मोबाईलवर बँकेचे मेसेज पाहत राहावे.

  • प्रधानमंत्री किसान योजना – केंद्र सरकारकडून दरवर्षी ६००० रुपये मिळतात.
  • नमो शेतकरी योजना – राज्य सरकारकडून देखील दरवर्षी ६००० रुपये मिळतात.

  • कोणत्याही फसवणुकीपासून सावध राहा.
  • तुमचा खाते नंबर किंवा ओटीपी कुणालाही देऊ नका.
  • या योजनांसाठी कोणतेही शुल्क लागत नाही.
  • फक्त सरकारी अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा.

जर तुमचं बँक खाते मान्यताप्राप्त बँकेत नसेल किंवा आधार लिंक नसेल, तर पैसे मिळणार नाहीत. वेळ वाया घालवू नका – आजच ते करून घ्या!

Leave a Comment